कोकणांत राष्ट्रवादीला मोठा धक्का
रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत परत जाणच्या निर्णयाची घोषणा केली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
श्री. जाधव यांच्या घरवापसीचे संकेत गेले काही महिने मिळत होते. मात्र त्याला दुजोरा मिळत नव्हता. मात्र गुहागर येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी शिवबंधन हाती घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना त्याला दुजोरा दिला.
कोकणात शिवसेना रुजवण्यासाठी जाधव यांनी कष्ट घेतले होते. मात्र, 2000 मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ठ्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेले काही वर्ष त्यांचे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याशी वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला.