मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोश्यारी हे या आधी देखील अनेकदा आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यपालांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ? असा सवाल उपस्थित केला आहे.
यापूर्वी देखील महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह विधानांमुळे राज्यपाल चांगलेच चर्चेत आले होते. शिवाय यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील राजकीय ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. मिटकरी यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये राज्यपाल हिंदीमध्ये बोलताना दिसत आहेत. राज्यपाल यावेळी म्हणतात,”सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”.
राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख !
नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? pic.twitter.com/B7anekQ2q0— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 7, 2023
याच कारणामुळे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी चांगलेच संतप्त झाल्याचे समजते. मिटकरी यांनी याबाबत एक ट्विट देखील केले आहे. ज्यात ते म्हणतात,”राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?”