करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. सेलिब्रिटी वर्ल्डही आपापल्या परीने सोशल मीडियावरून जनजागृतीचे मेसेज पोस्ट करत आहेत. त्याच दरम्यान एकता कपूर आणि रिचा चढ्ढामध्ये काही कारणामुळे तू तू मै मै व्हायला लागले आहे. हे सगळे नाटक आदिती मित्तलच्या एका ट्विटमुळे सुरू झाले.
करोनाची साथ भारतात पसरल्यानंतर जे लोक सरकारी दवाखान्यातून पळून गेले. त्यावरून या सरकारी दवाखान्यांवर लोकांचा किती भरवसा आहे, हे दिसून येते. असे आदिती मित्तलच्या पोस्टमध्य् म्हटले होते. रिचा चढ्ढाने या पोस्टबाबत सहमती दर्शवली. मात्र असे कृत्य करणे समर्थनीय होऊ शकत नाही, असेही रिचाने म्हटले आहे.
मात्र एकता कपूरने या चर्चेवर आक्षेप घेतला. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या विषयाचा आणि सरकारी यंत्रणेचा काहीही संबंध नाही. सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी स्वतःचाच जीव धोक्यात घातला आहे. तसे बघितले तर त्यांना पुरस्कार दिला असते तरी ते रुग्णालयांमधून पळून गेले असते असे एकता कपूरने म्हटले आहे.