नवी दिल्ली – मणिपूरमध्ये दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे आणि दिवसेंदिवस तेथील परिस्थिती चिघळत चालली आहे. अशात महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड काढणाऱ्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. यामुळे सर्वच राज्यांमधून केंद्र सरकारवर टीका होताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून भाजपच्या केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपने ‘बेटी बचाओ’चा नारा दिला होता, आता त्यांचा नारा कुठे आहे, असे ममता म्हणाल्या. आम्ही मणिपूरच्या लोकांसोबत आमची एकता व्यक्त करतो. आज केवळ मणिपूरच नाही तर संपूर्ण देशाची स्थिती बिकट आहे असा घणाघात ममता बॅनर्जी यांनीं केला.
भाजपवर टीका करताना ममता म्हणाल्या, भाजपच्या ‘बेटी बचाओ’ घोषणेचे रूपांतर आता ‘बेटी जलाओ’मध्ये झाले आहे. लोक अजूनही गप्प आहेत, परंतु येत्या निवडणुकीत देशातील जनता भाजपला नक्कीच उत्तर देईल अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली.
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee says, “You (BJP) gave ‘Beti Bachao’ slogan, where is your slogan now. We express our solidarity with the people of Manipur. Today Manipur is burning, the whole country is burning. In Bilkis Bano’s case, the accused were released on bail. In… pic.twitter.com/lDNYcJQtmK
— ANI (@ANI) July 21, 2023
बिल्किस बानोच्या प्रकरणात आरोपींची जामिनावर सुटका करण्यात. कुस्तीपटूंच्या प्रकरणात ब्रिजभूषण सिंग यांनाही जामीन मंजूर झाला. येत्या निवडणुकीत देशातील महिला तुम्हाला देशाच्या राजकारणातून हाकलून देतील असा इशारा देखील बॅनर्जी यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला.