वाघोली (पुणे) – केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय योजनांचा लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती
माजी सरपंच मिलींद हरगुडे यांनी दिली.
केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी जाधव व उपसरपंच सुनीता झांबरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी गावातील रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्याबाबत तातडीने उपाय योजना करून पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
गावासाठी पिण्याच्या पाण्याची योजना अंतर्गत रस्ते व सांडपाण्याबाबत जास्तीत जास्त निधी पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण यांच्याकडून मिळवून गावातील विकासकामे सर्व सदस्य व ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्या साथीने पूर्ण करणार असल्याची माहिती माजी सरपंच मिलींद हरगुडे यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गोरगरिबांना शासकीय योजनांचा लाभ पहिल्याच दिवशी देण्याचा संकल्प केल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ आगामी काळात गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असा आशावादही माजी सरपंच तानाजी हरगुडे यांनी व्यक्त केला.