मुंबई – भारतीय क्रिकेटमध्येही आता परिवर्तनाची लाट येण्याचे संकेत बीसीसीआयने ( BCCI ) दिले आहेत. अत्यंत कठोर व शतकातील सर्वात मोठी कारवाई करताना बीसीसीआयने अध्यक्ष व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट संघाची संपूर्ण राष्ट्रीय निवड समितीच बरखास्त केली आहे.
पाकिस्तानकडे ‘हे’ दोन भारतीय खेळाडू असते तर टी-२० वर्ल्डकप जिंकला असता – नासिर हुसेन
या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा गदारोळ होण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरीसाठी निवड समितीलाच जबाबदार धरले गेले आहे. इतकेच नव्हे तर निवड समितीच्या नव्या अध्यक्षपदासह सर्व पदांसाठी अर्जही मागवण्यात आले आहेत.
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (उत्तर विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग) व देवाशिष मोहंती (पूर्व विभाग) या सर्वांनाच डच्चू देण्यात आला आहे. आता लवकरच नव्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांची निवड केली जाणार आहे.
🚨NEWS🚨: BCCI invites applications for the position of National Selectors (Senior Men).
Details : https://t.co/inkWOSoMt9
— BCCI (@BCCI) November 18, 2022