मुंबई – भारताच्या टी-20 संघाच्या नेतृत्वात बदल होणार असून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya ) सोपवली जाणार असल्याचे बीसीसीआयच्या सुत्रांकडून कळत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी येणार असून याच मालिकेपासून टी-20 संघाचे सुकाणू पंड्याच्या हाती येणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये परिवर्तनाची लाट! बीसीसीआयकडून संपूर्ण निवडसमितीच बरखास्त
ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. तसेच या स्पर्धेत व त्यापूर्वीच्या विविध मालिकांमध्ये रोहितचे नेतृत्व कुचकामी ठरत होते. त्याचबरोबर त्याची वैयक्तीक कामगिरीही खालावली होती. त्याच्यावर कसोटी, एकदिवसीय व टी-20 या तीनही संघांच्या नेतृत्वाचा भार होता व दडपणही येत होते.
भारतीय क्रिकेटमध्ये परिवर्तनाची लाट! बीसीसीआयकडून संपूर्ण निवडसमितीच बरखास्त
त्यामुळे त्याच्यावरील वर्कलोड कमी करण्यासाठीच आता टी-20 संघाच्या कर्णधारपदी पंड्याची ( Hardik Pandya ) नियुक्ती होणार आहे. कसोटी व एकदिवसीय सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व रोहितकडेच राहणार अशले तरीही येत्या काळात संघाची जबाबदारी तसेच वैयक्तीक कामगिरी पाहूनच पुढील बदलही केले जातील असे संकेतही या सुत्रांनी दिले आहेत.
विश्वकरंडक 2024 साठीची तयारी
भारतीय संघासाठी 2024 साली होत असलेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा महत्वाची आहे. तोपर्यंत रोहितऐवजी पंड्याकडे ( Hardik Pandya ) संघाची धूरा सोपवण्यामागे याच तयारीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. संघातील नवोदित तसेच सेकंड बेंचवर असलेले खेळाडू संधीची वाटा पाहात आहेत. त्यांना या कालावधीत सातत्याने संधी दिली जाणार असून ही स्पर्धा जिंकण्याची योजना सध्या तयार केली जात आहे, असेही सुत्रांकडून समजले आहे.