कट्टरतावाद्यांमुळे आपले मूळ विसरत असल्याचा लेखिका शर्वरी झोहरा यांचे मत
वॉशिंग्टन : कोणताही बांगलादेशी हा अन्य भारतीयांपेक्षा वेगळा नाही. कारण तोही मुळचा हिंदुच आहे, असे मत अमेरिकास्थित बांगलादेशी लेखकिा शर्वरी झोहरा अहमद यांनी व्यक्त केले. मात्र, बांगलादेशी सध्या आपले मूळ विसरले आहेत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
क्वांटीको या अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय भयपट मालिकेच्या शर्वरी या सहलेखिका आहेत. या मालिकेत प्रियांका चोप्रा भूमिका साकारत आहेत. बांगलादेशीची बंगाली म्हणून असणारी ओळख कट्टरतावाद्यांच्या प्रभावामुळे हरवली आहे. तरीही बांगलादेश त्यांचा हिंदू वारसा कसा नाकारणार? आम्ही हिंदूच आहोत. इस्लाम त्यानंतर आला, असे शर्वरी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ब्रिटीशांनी आमची पिळवणूक केली. आमच्यापासून चोरले आणि आमची हत्या केली, असे त्या अखंड भारताविषयी म्हणाल्या. या वसाहतवाद्यांनी ढाक्यातील मलमलीचा व्यवसाय नष्ट केला. ब्रिटीशांनी केलेली भारताची लूट आणि फाळणी हा त्यांच्या पहिल्या कादंबरीचा विषय आहे. पायाखालची धूळ (डस्ट अंडर हर फिट) ही माझी पहिली कादंबरी. त्यामुळे इस्लाम हा देशाचा धर्म असणाऱ्या बांगलादेशातील मी असल्याची मला शंका येते, असेही त्या विषण्णतेने म्हणाल्या.
जागतिक महायुध्दाच्या काळात इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विस्टन चर्चील यांची भूमिका ही वर्णद्वेषी होती. त्यांनी बंगालमधून आणलेला तांदूळ जवानांना खायला घातला. मात्र नंतर त्याबाबत काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी निर्माण केलेल्या कृत्रीम दुष्काळात सुमारे 20 लाख बंगाली मरण पावले होते. जेव्हा लोक चर्चीलचा जयजयकार करतात तेंव्हा तो हिटलरने ज्यूंच्या केलेल्या कत्तलीचा असल्यासारखा मला भासतो, असे त्यांनी सांगितले.
त्यांची कादंबरी कोलकात्यात म्हणजे त्याचेळच्या कलकत्त्यावर आधारीत आहे. कलकत्ता त्यावेळी महानगर होते. त्याकाळात येथील लोकांची पिळवणूक कशी झाली, येथील संपत्ती कशी लुटली गेली. जनतेत कशी फूट पाडली आणि त्यांच्या द्वेषभावना रुजवली गेली याचे मी चित्रण केले आहे. ही वस्तुस्थिती जगापुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या.