ICC U19 World Cup: भारतीय संघाने शनिवारी ब्लूमफॉन्टेन येथे अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दमदार सुरुवात केली होती. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. बांगलादेशला 84 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशसमोर विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 45.5 षटकांत केवळ 167 धावांवरच मर्यादित राहिला. मात्र हा सामना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
या सामन्यात बांगलादेशचे आरिफुल इस्लाम आणि महफुजुर रहमान रब्बी हे भारताचा कर्णधार उदय सहारन याच्यासोबत भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडिओमध्ये उदय सहारन अम्पायरशी बोलताना दिसतो आणि वादाची तक्रार करत असतो. त्याचवेळी इस्लाम आणि महफुजुर रहमान रब्बी यांनी अम्पायरसमोर उदयसोबत भांडण केले. यावेळीअम्पायरने मधस्थी केली आणि भांडण थांबवले.
— Sitaraman (@Sitaraman112971) January 20, 2024
24व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूनंतर ही घटना घडली. भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यावर बांगलादेशचा गोलंदाज अतिशय आक्रमक प्रतिक्रिया देताना दिसला. मात्र त्यांच्या वादामागचे कारण नेमकं काय होतं हे स्पष्ट होऊ शकले नाही.
पुढील सामना कधी आणि कोणाशी होणार?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. भारताकडून आदर्श सिंगने 96 चेंडूत 76 धावा केल्या तर कर्णधार उदयने 94 चेंडूत 64 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून इक्बाल हुसेन इमॉन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यानंतर आता भारतीय संघ 25 जानेवारीला आयर्लंडविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात 28 जानेवारीला सामना होणार आहे.