नगर, (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संचालक, अधिकारी आणि कर्जदारांनी जिल्हा न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मंगळवार (दि.१६) रोजी सुणवणी होवून जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी जामिन अर्ज नामंजुर केले आहेत.
नगर अर्बन च्या २९१ कोटी २५ लाख ६१ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळा प्रकरणी आरोपी सहा.मुख्य व्यवस्थापक मनोज वसंत फिरोदीया, कर्जदार चंद्रकांत मोरे, (रा. पिंपरी चिंचवड), अविनाश प्रभाकर वैकर, प्रविण सुरेश लहारे यांनी जिल्हा न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला होता.
अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमर्फत सुरू आहे. पोलीस प्रशासनाने या संपूर्ण घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे. यात प्रथमदर्शनी सुमारे 105 जणांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे.
तर सुमारे २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आरोपींपैकी १० जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यात संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, सीए शंकर घनश्यामदास अंदानी, बँकेचा अधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनोज वसंतलाल फिरोदिया, कर्जदार प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर, अमित वल्लभभाई पंडित यांचा समावेश आहे.
बँकेतील कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेचा गैरवापर, तसेच कर्जाच्या रकमेतून जुन्या कर्जाची रकमा भरणे, काही रक्कम संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आलेले आहे. फॉरेन्सिक अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आलेले असून या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.
जामिन अर्ज सुणवणी प्रककरणी सरकारी पक्षाच्या वतीने २०१३ ते २०१९ या काळात सदर आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कादपत्र, मिळकतीचे बनावट अहवाल, इतर बनावट कादपत्रे, तसेच आरोपींच्या खात्यावर संशयास्पद रकमा आल्याचे दिसून येत आहे. तसेच फाॅरेन्सीक आॅडीटमध्ये अनेक प्रकरणात आरोपेंचा सहभाग असल्याचे दिसत असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अनिल घोडके यांनी केला.