नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रभू श्रीरामांना (Shree ram) साकडे घालण्यासाठी गेलेल्या आमदार बच्चू कडूंचा (Bachhu kadu) ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यांच्या सभेला परवानगी दिली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी चौकातच छोटेखानी भाषण केले. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत 100 च्या वरती गाड्यांचा ताफा अयोध्यामध्ये गेला होता. पोलिसांनी फक्त पाच वाहने घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. (Bachhu kadu in ayodhya)
जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नकारल्यानंतर लता मंगेशकर चौकात बच्चू कडू यांनी माईकवर छोटेखानी भाषण केले. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आलो तरीही आम्हाला थांबवले हे दुर्देव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, ज्यांनी रक्त आणि पाणी एक केले ते शेतकरी सुखी नाही. बिसलरीला भाव आहे पण येथील शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही. ही लढाई लहान असली तरी धर्म, जात बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी लढा सुरू केला आहे. या ठिकाणी हिंदू, मुसलमान देखील शाहिद झाले आहेत. शेतकऱ्यांना अर्थिक आरक्षण मिळालं पाहिजे. उत्तरप्रदेशचे जेव्हा बजेट जाहीर होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी किती बजेट राहते. देशासाठी सगळ्यांनी आपले रक्त दिले आहे.
ज्या प्रमाणे मंदिराचे निर्माण होत आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या घराची निर्मिती झाली पाहिजे. 75 वर्षात शेतकऱ्यांचं घर होत नसेल होत तर कशाचे राजकारण आहे? “गर्वसे कहो हम किसान है.’ शेतकरी शेतमजूर यांच्या भल्यासाठी मी आयोध्याला आलो आहे, असे यावेळी बोलताना कडू यांनी म्हटले.
तसेच, येथे रामलल्लाचे दर्शन घेऊन प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद चढवणार आहे, असेही कडूंनी पुुढे म्हटले. दरम्यान, लखनौ विमानतळावर बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किसान क्रांती दलाच्या वतीने अमरेश मिश्रा यांच्या वतीने बच्चू कडू यांच स्वागत करण्यात आले.