Ravi Rana । भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. यावरून आता महाराष्ट्र एनडीएमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असली तरी महायुतीत राणा यांना प्रचंड विरोध झाला आहे.
प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील यापूर्वी आपण उमेदवार देणार असल्याची तयार दाखवत राणा यांना विरोध दर्शवला होता. तर या विरोधाला नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी यांनीसुद्धा प्रतिउत्तर देत कडूंवर टीका केली होती. अशात आता भाजप पक्षाने नवनीत राणा यांना तिकट दिल्यानंतर रवी राणा यांनी माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांना विनंती केली आहे.
Ravi Rana । नेमकं काय म्हणाले रवी राणा
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांवर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अमरावतीच्या जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी नवनीत राणा यांची निवड केली. त्यासाठी मी अमरावतीच्या जनतेकडून त्यांचे आभार व्यक्त करतो.
नवनीत राणा यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपाची बाजू मांडली आहे. त्यामुळेच देशाच्या हितासाठी पंतप्रधान मोदींनी नवनीत राणा यांची निवड केली आहे. ते पुढे म्हणाले आगामी निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी आशीर्वाद द्यावा. अशी माझी विनंती आहे’ असं म्हणत रवी राणा यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हे वाचलं का ? ‘केजरीवाल यांना अटक ते काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचा मुद्या…’ अमेरिकेने पुन्हा केले भाष्य