आपल्या राहुटी कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू जनसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. ‘फैसला ऑन द स्पॉट’ करणारे आमदार म्हणून बच्चू कडू परिचित आहेत. राहुटी संदर्भात बच्चू कडू सांगतात
“राहुटी” तसा हा शब्द जुनाच आहे परंतु काळानुरूप हा शब्द लोप पावला. ब्रिटीश काळात दळणवळणाचे साहित्य नसल्याने अधिकारी, कर्मचारी हे गावातील लोकांचे काम करायला गावात तंबु टाकुन मुक्काम करत असे. यालाच “राहुटी” असे म्हणतात.
हिच राहुटी आम्ही २००५ पासून मतदारसंघात गावोगावी नेत आहोत. पहिल्याच वर्षी तब्बल ५५,००० प्रकरणाचा यामध्ये निपटारा करण्यात आला. आत्तापर्यंत ७ शासकीय यात्रेत लाखो लोकांचे शासकीय काम करण्यात आले आहे. सर्व ३६ कार्यालय टेम्पो मध्ये गावोगावी पोहचतात.
यावर्षी हाच उपक्रम आम्ही ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात मतदार संघात घेणार आहोत. पहिले आमदारांची राहुटी आपल्या गावात हा उपक्रम राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात या नावाने गावोगावी जाणार…