बेल्हे -कांदळी (ता. जुन्नर) येथे डिजिटल ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे-मुंबईवरून गावात येणाऱ्या लोकांनी काय काळजी घ्यावी, यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नगदवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या केले होते.
सरपंच विक्रम भोर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या हद्दीत लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावावरून जवळपास तेराशे पन्नास लोक आले आहेत. बाहेरगावाहून आलेले लोक आपलेच आहेत. त्यांना गावबंदी न करता होम क्वारंटाइन करण्यात येत आहे.
मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करणार आहे. तुषार बढे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपसरपंच सुदर्शन बढे, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोर, पांडुरंग कुतळ, गणपत गुंजाळ, लक्ष्मीबाई बढे, तानाजी बढे, दिनकर बढे, संपत बढे, गोविंद बढे, पोपट बढे उपस्थित होते.