शेवगाव -करोना महामारीला रोखण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश आल्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक असून मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. राज्यशासन करोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबवू शकले नाही. या साथरोगामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरोग्य, आर्थिक, सामाजिक, उद्योग, शेती सर्वच क्षेत्रात भितीचे वातावरण असून जनतेच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. तरी महाविकास आघाडीच्या ृृृृृृसुस्त शासनाने जागे होण्याची आवश्यकता आहे. अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करोना रोखण्यासाठी केंद्र शासनाने ज्या गाईडलाईन दिल्या त्यासुध्दा राज्यसरकारने प्रभावीपणे आमलात आणल्या नाहीत. रुग्णांना योग्य उपचार करण्यात शासन अपयशी ठरले आहे. तसेच अद्याप कोणतेही आर्थिक पॅकेज दिलेले नाही. या सर्व बाबीचा भाजप कार्यकत तीव्र निषेध करत आहेत. तसेच कोव्हिड 19 च्या प्रतिबंधासाठी तातडीने पावले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, सरचिटणीस भिमराज सागडे, सुनील रासने, नगरसेवक कमलेश गांधी, अंकुश कुसळकर, संतोष कंगनकर, सुभाष बरबडे आदी प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.