चंद्रपूर – राज्यात विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. ही लाट एप्रिल महिन्यातही कायम असून चंद्रपूर जिल्ह्यात आज 45.4 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट पसरली आहे. गेल्या दोन दिवसात ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचे टाळले. काल (20 एप्रिल) जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही महाराष्ट्रातल्या तीन शहरांमध्ये झाली आहे. ब्रह्मपुरीत 45.3, चंद्रपुरात 45.2 अंश सेल्सिअस तापमान तर अकोल्यातही 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.