नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार 2014 साली सत्तेत आले. त्यानंतर मोदींनी 2019 मध्ये देखील सत्ता कायम राखली. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन आणि अच्छे दिनचं स्वप्न विशेष गाजल होतं. दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन केवळ आश्वासनच राहिल्याचं मागील काही वर्षात दिसून आलं.
नुकतंच केंद्रातील मोदी सरकारने आगामी वर्षाचं आर्थिक बजेट सादर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केला. त्यामध्ये नोकऱ्यांसंदर्भातही त्यांनी घोषणा केली आहे.
पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. तसेच देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्यांची नोकऱ्यांसंदर्भातील घोषणा आता चर्चेचा विषय ठरत असून आश्वासन दरवर्षी २ कोटी नोकऱ्यांचं होत. मग 60 लाख नोकऱ्यांचीच घोषणा का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
अर्थात अर्थसंकल्पातच 60 लाख नोकऱ्यांची घोषणा केली. म्हणजे दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन केवळ आश्वासनच होत का, असा प्रश्न बेरोजगार तरुणांना पडल्याशिवाय राहणार नाही.