दुबई – बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) व पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यात आशिया करंडक स्पर्धेवरून सुरु झालेला वाद निवळण्याची सध्यातरी कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे या स्पर्धेचेच भवितव्य टांगणीला लागले असल्याचे चित्र दिसत आहे. भारतातील केंद्र सरकारने जर बीसीसीआयला परवानगी दिली तरच या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिसनला रवाना होइल अन्यथा या स्पर्देतून भारतीय संघ अंग काढून घेइल, असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
तसेच रविवारी झालेल्या आशिया क्रिकेट परिषदेच्या बैठकीतही सचिव जय शहा यांनी याचा पुनरुच्चारही केला. त्यावर आक्षेप घेत पाकिस्तान मडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी परिषदेलाच बीसीसीआयवर कारवाई करण्यास सांगितले. तसेच जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी आला नाही तर मग पाकिस्तानचा संघही यंदाच्या मौसमात भारतात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार नाही अशी धमकीही दिली.
अशाच स्वरुपाचे वक्तव्य त्यांचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनीही केले होते. आता परिषदेच्या बैठकीची पहिली फेरी रविवारी पार पडली असून येत्या महिनाअखेरीस दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. त्यात काही तोगा निघाला व ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवण्याच्या जागी तटस्थ ठीकाणी (दुबई, अबुधाबी, शारजा) खेळवली जाणार असेल तरच भारतीय संघ त्यात सहभागी होऊ शकतो असेही शहा यांनी या पहिल्या बैठकीत सांगितले आहे. आता यावर पुन्हा एकदा आक्रमकता दाखवताना सेठी यांनी आमचा संघी भारतात योणार नाही हीच भूमिका पुन्हा एकदा सांगितली. आता येत्या काळात यावर तोडगा निघणार का व ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानूसार होणार का असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मियांदादने गरळ ओकली
भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी आला नाही तर खड्ड्यात गेला, असे अत्यंत आक्षेपार्ह विधान पाकिस्तानचा माजी कसोटीपटू जावेद मियांदाद याने केले आहे. भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकण्यासाठी प्रख्यात असलेल्या मियांदादने पाक मंडळाने मनते घेऊ नये असेही म्हटले आहे. उलट भारतीय संघच पाकिस्तानशी केळायला घाबरतो असेही नमुद केले आहे.
अक्रम म्हणतो हा निव्वळ पोरकटपणा
पाकिस्तान मंडळाने हा सुरु केलेला एक पोरकटपणा आहे. तूम्ही आमच्याकडे आला नाहीत तर आम्हीही तूमच्याकडे येणार नाही असे वक्तव्य करणे केवळ बालिश किंवा पोरकटपणाचे आहे. पाकिस्तान मंडळाने सगळ्या परिस्थितीचे आकलन करावे व सहकार्याची भूमीका घ्यावी, असे मत त्यांचा माजी कर्णधार व महान गोलंदाज वासीम अक्रम याने म्हटले आहे.
बीसीसीआय भूमीकेवर ठाम
भारतातील केंद्र सरकारच भारतीय संघाच्या पाकिस्तानातील सहभागावर निर्णय घेऊ शकते. सध्यातरी या दोन देशांत राजकीय तणाव आहे, त्यामुळे हा निर्णय बीसीसीआय घेऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे. शहा यांनी तर यावर आता बोलण्यासारखे काहीही उरले नसल्याचे म्हणत आपण आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचेही दाखवून दिले आहे. शहा हेच बीसीसीआयसह आशिया क्रिकेट परिषदेचेही सचिव आहेत.