लाहोर – श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असतानाही आगामी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा तेथेच आयोजित होईल व यशस्वीही ठरेल, असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) व्यक्त केला आहे.
सध्या श्रीलंकेत राजकीय परिस्थिती हाताबाहेर जात असून, अन्नधान्य टंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र, यातून श्रीलंका लवकरच सावरेल व सगळ्याच क्षेत्रात पुन्हा उभारी धरेल. आशिया क्रिकेट समितीने यंदाच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला दिले आहे.
मात्र, देशातील अराजकता पाहता या स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरीही पाक मंडळाने या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका अत्यंत यशस्वीपणे करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.