साऊदम्पटन – भारताचा ऑफस्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने अनोखी कामगिरी नोंदवली आहे. आयसीसीने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम अश्विनने रचला आहे.
या स्पर्धेत अश्विनने 71 बळी घेत विश्वविक्रम रचला आहे. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स असून त्याने 70 बळी घेतले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर असून 69 गडी बाद केले.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी चौथ्या स्थानावर असून त्याने 56 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लायन साऊदीसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.