Eknath Shinde : जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आज (दि.11) सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बीआर गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
या प्रकरणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सलग 16 दिवस सुनावणी झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर 2023 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता 96 दिवसांनंतर सोमवारी म्हणजेच 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकिय विश्वातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. आज अधिवेशनात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील पंतप्रधान मोदींनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची (balasaheb thakre) इच्छा पूर्ण केली असं म्हणाले.
बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली !
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत आहे. देशाची राजकीय एकात्मता राखणारे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलले होते, ते कोर्टाने आज वैध ठरवले आहे.
त्याबद्दल मी मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करतो. जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपून ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिथे आता मुक्त वातावरणात निवडणूक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम 370 रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. मोदींनी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली. काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात.
मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम 370 रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. मोदींनी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली. काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात.
मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.