नवी दिल्ली – शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द ठरविणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज योग्य ठरविला. न्यायालयाने खोतकर यांना दोन लाख रूपयाचा दंड सुध्दा ठोठावला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. रामासुबमण्यम यांनी आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरविला. एवढेच नव्हे तर, न्यायालयाने खोतकर यांना दोन लाखाचा दंड सुध्दा ठोठावला आहे. यातील एक लाख रूपये कैलाश गोरंटयाल यांना तर एक लाख रूपये दुसया याचिकाकत्र्याला देण्यास सांगितले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द केली आहे. खोतकर यांनी यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज या प्रकरणाचा निकाल लागला.
माजी आमदार कैलास गोरंट्याल व शेख चंद पाशा शेख जानी यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडं उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते. त्यांची निवड रद्द करावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.
ज्येष्ठ अधिवक्ता मिनाक्षी अरोरा आणि शशीभूषण पी. अडगावकर यांनी गोरंटयाल यांची बाजू मांडली. तर, रविंद्र अडसुरे यांनी अर्जुन खोतकर यांची बाजू मांडली.