अर्हम कॉलेजच्या बांधणीमध्ये उभारणीमध्ये आणि विकासामध्ये डॉ. शैलेश पगारिया, श्रीकांत पगारिया आणि डॉ. आतिश चोरडिया यांचे योगदान मोठे आहे. एखादी संस्था उभी करताना तन मन आणि धन अर्पण करून अनेक काळ प्रतीक्षा करावी लागते गुणवत्ता सिद्ध करावी लागते त्यावेळेस संस्थेचा नावलौकिक मिळतो आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत होतो ही महत्त्वाची गोष्ट डॉ. शैलेश पगारिया, श्रीकांत पगारिया आणि डॉ. आतिश चोरडिया या तिघांनीही साध्य केली आहे. अर्हम कॉलेजच्या गेल्या अनेक वर्षांच्या यशस्वी वाटचाली मध्ये यातील मूर्तींचे योगदान हे लक्षणीय आहे असे मानावे लागेल
आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवत असत. लहानपणापासून ते 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असत. त्याला पुस्तकी अभ्यासासह अध्यात्मिक संस्कार आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे. नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. शिक्षणाच्या पद्धती बदलून इंग्रजी शाळा व महाविद्यालये देशात आली. आज देशातील सर्वच विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आहे.
परंतु मागील पाच वर्षात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे देशात डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत. यातच भर म्हणजे मागील वर्षी आलेली जागतिक महामारी कोव्हिड-19 होय. या एक वर्षात देशातील ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात वाढले. या बदलत्या पद्धतीला सामोरे जात अर्हम कॉलेजनेही नव्या तंत्रज्ञानासह जुळते घेत आपली शिक्षण पद्धतीही सहजसोपी कशी करता येऊ शकेल, यावर मेहनत घेतली.
ऑनलाइन शिक्षणात गुणवत्ता टिकलेली
ऑनलाईन शिक्षणात सुद्धा गुणवत्ता टिकून असल्याचे प्रतिपादन अर्हम कॉलेजचे डॉ. अतिश चोरडिया यांनी केले आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक शिक्षण संस्था शाळा महाविद्यालये यांचं कामकाज ऑनलाइन स्वरूपात सुरू होतं. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शाळेत किंवा कॉलेजात येणे शक्य नव्हते. शिवाय शिक्षकही युट्युब किंवा ऑनलाइन माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व असूनही सर्व अडथळ्यांवर मात करून अर्हम कॉलेजने आपली गुणवत्ता टिकवली असल्याचे दिसून येत आहे.
चोरडिया पुढे म्हणाले की अर्हम कॉलेजने स्वतःचे एक ऍप तयार केले असून या ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्ग अटेंड करणे सोपे झाले आहे. या ऍपमुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणही व्यवस्थितपणे आत्मसात केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांची उत्तरेही शिक्षकांनी दिली. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता कायम राखण्यात यश मिळवले.
अर्हम कॉलेजच्या व्यवस्थापनाने सर्व शिक्षकांसाठीही प्रशिक्षण आयोजित केले होते. त्याद्वारे अतिशय योग्य स्वरूपात तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत समजतील अशा पद्धतीने शिक्षकांनी आपले तास घेतले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरले. तसेच विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये एक अनौपचारिक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग अर्हम कॉलेजच्या माध्यमातून अतिशय यशस्वी झाल्याचे दिसून आले.
वर्षाच्या अखेरीस परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. हे सारे काही शक्य झाले ते संस्थेने निर्माण केलेल्या ऍपमुळे. शिक्षणात बाधा न येता गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम अर्हम कॉलेजने यशस्वी करुन दाखवले आहे.
आज शिक्षण हे आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. कारण चांगला शिक्षणाच्या बळावरच योग्य करिअर निवडले जाऊ शकते. कोणत्याही देशाला विकसित करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे.
आपल्या देशात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. देशातील परंपरागत शिक्षणाने आधुनिक रूप घेतले. वर्तमान काळात ई एज्युकेशन अर्थात ऑनलाइन शिक्षण भारतासह जगभरात लोकप्रिय झाले आहे.
ऑनलाइन शिक्षण एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात शिक्षक इंटरनेटचा वापर करून देशातील किंवा जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.
ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय?
जगभरात पसरलेली महामारी कोविड 19 मुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे घरातून बाहेर निघून शिक्षण प्राप्त करणे कठीण झाले होते. अशा काळात देशातील विविध शाळांमधील शिक्षकांनी ऑनलाइन माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. स्काईप, व्हाट्सअप, झूम व्हिडीओ इत्यादी काही प्रसिद्ध मोबाईल ऍप आहेत ज्यांच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण दिले जाते. यात विद्यार्थी आपापल्या घरी बसून लॅपटॉप अथवा मोबाईलच्या सहाय्याने शिक्षण मिळवू शकतात.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित होत असताना दुसरीकडे आँनलाईन आणि इंटरनेटवरील गुन्हेगारी खूप वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अर्हम कॉंलेजतर्फे सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील नवा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. त्यामुळे फोरेन्सिक अकौंटिंग सारख्या क्षेत्राला बळ मिळण्याची शक्यता वाढली आहे…
ऑनलाइन शिक्षणाचे फायदे
ऑनलाइन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे नवीन स्वरूप म्हटले जाऊ शकते. ज्यात विद्यार्थ्यांना लांब प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या लॅपटॉप वरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणासाठी आवश्यकता एवढीच आहे की विद्यार्थ्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल / कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप असायला हवे. आज शाळा, कॉलेज तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोचिंग साठी घराबाहेर न जाता, घरीच राहून निश्चिंतपणे शिक्षण घेत आहेत. या शिक्षणामुळे दूर शाळा असणाऱ्या विद्यार्थ्याला लागणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो. विदेशात शिक्षणाची ईच्छा असूनही आर्थिक परिस्थिती ठीक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदा झाला आहे. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून लेक्चर करू शकतो. परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. ज्यामुळे कित्येकदा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत.
व्यवहारीक अनुभव आणि प्रात्यक्षिके ही शिक्षणाच्या दृष्टिने खूप महत्त्वाची असतात. ऑनलाईन शिक्षणात ऍनिमेटेड व्हिडिओचा उपयोग केला जातो. शाळेत विद्यार्थी भौतिक वस्तूंचे निरीक्षण करून अभ्यास करतात. हा प्रात्यक्षिक स्पर्श त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करतो. परंतु ऑनलाईन शिक्षणात याची कमी असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होत नाही. मात्र, या समस्येवरही अर्हम कॉलेजने मात केली. प्रात्यक्षिके ऑनलाईन तर घेतलीच शिवाय विद्यार्थ्यांच्या छोट्या-छोट्या गटांना एकत्र करुन त्यांच्याकडून प्रॅक्टीकल्सही अखेरच्या काळात करुन घेतली.
प्राचार्य डॉ. दिलीप शेठ म्हणतात…
कोव्हिड-19 च्या साथीमुळे शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले. ई-लर्निंगची जी गोष्ट आणखी दहा-बरा वर्षांनी अनिवार्य आणि काळ सुसंगत ठरणार होती, ती पद्धत आता सर्वांनाच अनिवार्यपणे वापरावी लागत आहे. या गोष्टीकडे सकारात्मक भावनेने बघणे गरजेचे आहे. हे अशासाठी की आता विद्यार्थी पुण्यातच काय, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला, तरी इंटरनेटच्या माध्यमातून तो क्लासेसना हजेरी लाऊ शकतो. क्लासमध्ये येण्यासाठी आणि पुन्हा घरी जाण्यासाठी त्याला प्रवास आणि वेळ खर्च करावा लागत नाही. त्यामुळे या मिळणाऱ्या अतिरिक्त वेळेत तो अधिक अभ्यास करु शकतो. वर्गामध्येही विद्यार्थ्यांना बसण्याच्या जागेचा प्रश्न उरत नाही आणि वर्गात गर्दी झाल्याने साथ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही ऑनलाईन क्लासेसमुळे उरत नाही. आता यामध्ये ऑनलाईन लेक्चर सुरु असताना अन्य कामात, खेळात किंवा टीव्ही बघण्यात वेळ घालवणारे विद्यार्थीही आढळतात.
मात्र, अशा विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. शिवाय अशा क्लासेसकडे लक्ष देणे हीच काळाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांना पटते आहे. याशिवाय पालकांच्या समोरच विद्यार्थी असल्याने, त्याचे अभ्यासात लक्ष आहे की नाही, हे समजणेही सोपे जात आहे. अर्हम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेसचा पर्याय समर्थपणे राबवण्यात आल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही समाधानी आहेत.