राजगुरूनगर (प्रतिनिधी): ३ जुन रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती दुरुस्तीसाठी साठी १६ कोटी, ५१ लाख रुपये निधी मंजूर झाला असून खेड तालुक्यातील शाळा व अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ कोटी ९४ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या इमारतीच्या दुरुस्तीचे कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी दिली.
राज्यात ३ जुनला निसर्ग चक्री वादळ आले होते त्यामध्ये खेड तालुक्यातील शाळा अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागरिकांच्या घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले होते. शाळा अंगणवाड्या, आरोग्य केंद्राच्या इमारतींचे इमारतीचे छप्पर उडुन गेली होती तर काही ठिकाणी भिंती कोसळून नुकसान झाले होते. या निसर्ग चाकरी वादळाचा मोठा फटका खेड तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना बसला होता. त्यात मोठे नुकसान झाले होते.
तालुक्यातील २९ गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम,जिपचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली होती. जिप अध्यक्षा पानसरे यांनी यांनी नुकसानग्रस्त शाळा अंगणवाड्या आरोग्य केंद्र आणि नागरिकांच्या घरांचे जनावरांच्या गोठ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. नुकसान ग्रस्त इमारतींच्या उभारणीसाठी अवघ्या दीड महिन्यांत तातडीने भरपाई मिळाल्याने तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील शाळा व अंगणवाड्या व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी शिफारस केल्याप्रमाणे २९ शाळांसाठी १ कोटी, ८ लाख, ७२ हजार रुपये,४१ अंगणवाड्यासाठी ५७ लाख ३८ हजार तर तालुक्यातील १० आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरुस्तीसाठी २८ लाख, ७५ हजार रुपयांची नुकसान भरपाई रक्कमेला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी सांगितले.
निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या शाळा व दुरुस्तीला मिळालेला निधी पुढीलप्रमाणे- बीबी- (१५ लाख), धामणे- (१४ लाख ६२ हजार), मांजरेवाडी पिंपळ- (३ लाख), मांजरेवाडी धर्म -( ४ लाख ७३ हजार), वाघु- (४ लाख), दावडी- (८ लाख), चांदुस- (२ लाख ९० हजार), औदर- (२ लाख ५० हजार),गुळाणी- (१ लाख), कडधे- (१ लाख ५० हजार), वि-हाम-( ४ लाख), वाडा- (१ लाख), वांजळे- (३लाख), कडुस- ( ४ लाख), जऊळके खु.- (१ लाख ५० हजार), कुडे बु.-(१ लाख), आडगाव- (४ लाख), कमान-(५० हजार), हेद्रुज- (५० हजार), साबळेवाडी- (१ लाख ५० हजार), आखतुली- (३ लाख ५० हजार), कडुस नं १ -( ४ लाख), शिरगाव- (३ लाख), नायफड- (३ लाख), वांद्रे-( ४ लाख), शिवे- (२ लाख), खामकरवाडी- (२ लाख ९७ हजार), कोयाळी तर्फे चाकण- (५ लाख), चाकण- (३ लाख).
निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या अंगणवाड्या व दुरुस्तीला मिळालेला निधी पुढीलप्रमाणे- अढळवाडी (२ लाख ४६ हजार), मुकेवस्ती (१ लाख २९ हजार), खालचे भोमाळे (१ लाख ६५ हजार), धुवोली (१ लाख ३९ हजार), वांजळे (१ लाख ३९ हजार), शेरेवाडी (१ लाख ३९ हजार), खरोशी गावठाण ( (१ लाख २० हजार), टोकावडे (१ लाख ३९ हजार), वाडा (१ लाख ३९ हजार), खालची सुपेवाडी (१ लाख ३९ हजार), ढगाडवाडी (१ लाख ३९ हजार), मोहकल (१ लाख ७ हजार),पाभे (१ लाख ६५ हजार),कहू (२ लाख ६० हजार),शिरोली (१ लाख ९१ हजार), पोखरणस्थळ (१ लाख ८४ हजार), भिवेगाव (२ लाख ),खामकरवाडी (१ लाख ३९ हजार), भोरगिरी (१ लाख २० हजार),वरची सुपेवाडी (१ लाख ३० हजार), सुरकुलवाडी (१ लाख २० हजार), वाळद (१ लाख), धारेवाडी (१ लाख २० हजार), गोरेगाव (१ लाख २०हजार),शिवे (१ लाख ५० हजार), ऐनाडेवस्ती (१ लाख ५० हजार),पराळे (१ लाख ७० हजार),भिसंबा ठाकरवाडी (१ लाख), धामणे (१ लाख), टेमगिरवाडी ( ९४ हजार), पांगरी ( ६१ हजार), आंभू (१ लाख २ हजार),कडधे २ (२० हजार), जाधवदरा (२५ हजार),मिरजेवाडी (२५ हजार), घनवटवाडी (२५हजार), भालसिंगवाडी (२ लाख ६० हजार ),सुपे (२ लाख ६० हजार ), आडगाव (२ लाख ४६ हजार ),वाघु (२ लाख ४६ हजार ), हेंद्रूज (१लाख ५ हजार ),