पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावी परीक्षार्थींना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकसाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च, तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान याविषयाची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च या कालावधीत होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर येण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान विद्यार्थ्यांना निशुल्क समुपदेशन करतील. मात्र, विद्यार्थी पालक यांनी त्यांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न विचारू नयेत, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक
१) ७३८७४००९७०, २) ९०१११८४२४२, ३) ८४२११५०५२८, ४) ८२६३८७६८९६, ५) ८३६९०२१९४४, ६) ८८२८४२६७२२, ७) ९८८१४१८२३६, ८) ९३५९९७८३१५ , ९) ७३८७६४७९०२
१०) ९०११३०२९९७