नवी मुंबई – नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 11 मे ते 17 मेपर्यंत आठ दिवस एपाएमसी मार्केट पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
वाशी येथील एपीएमसीतील प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत भाजीपाला, फळे, धान्य मार्केट, मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट हे पाचही मार्केट बंद असणार आहे.
हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतला. यावेळी बैठकीला कोकण आयुक्त शिवाजी दौंड, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त आणासाहेब मिसाळ, नवी मुंबई पोलीस संयुक्त आयुक्त राजकुमार व्हटकर, डीसीपी पंकज दहाने, माथाडी नेता नरेंद्र पाटील आणि बाजार समितीचे व्यापारी उपस्थित होते.
मात्र, मार्केट बंद असले तरीही मुंबईकरांना अन्न धान्याचा, भाजीपाल्याचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा होणार नाही, अशी माहिती अनुप कुमार यांनी दिली.