शेतकऱ्यांची फेरलिलाव करण्याची मागणी : बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक ठप्प
नगर – नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी (दि.7) रोजी कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाह्यवळण रस्त्यावर तब्बल तीन तास ठिय्या दिला. त्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.
शेतकरी आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासन आंदोलनस्थळी दाखल झाले. परतिच्या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात सोमवारी कांद्याचे भाव साडे पाच हजार क्विंटल पर्यंत गेल्याने आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला.
मात्र सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याचे भाव 100 रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत प्रती क्विंटल पर्यंत घसरल्याने शेतकरी संतप्त झाले. हे भाव मान्य नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कांद्याचे लिलाव बंद पाडले. व थेट बाह्यवळण रस्त्यावर तीन तास ठिय्या दिला. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतकरी संतप्त झाल्याने कोतवाली पोलीस ठाण्याचा फौजफाटा हा आंदोलनस्थळी दाखल झाला.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांचा कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामधून बचावलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणला. व त्यातुन काही झालेले नुकसान भरून निघेतल अशी अशा शेतकऱ्यांना होती.
मात्र कांद्याचे बाजार घसरल्याने शेतकरी ही संतप्त झाले. व त्यांनी आंदोलनाचा पावित्रा उचलला. सुमारे तीन तास आंदोलन चालल्याने शेवटी सभापती विलासराव शिंदे, उपसभापती रेवणनाथ चोभे, संचालक दिलीप भालसिंग, बहिरू कोतकर, बाळासाहेब जाधव, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर आंदोलन कर्ते शेतकरी व व्यापारी यांच्याशी समन्वय साधत चर्चा केली.