प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक के व्ही राजू यांचे शुक्रवारी बंगळुरू येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आजाराने त्रस्त असेलेल्या राजून यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. के व्ही जयराज यांचे ते धाकटे भाऊ होते. राजू यांच्या निधनानंतर कन्नडसह बॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
अमिताभ यांच्या ‘इंद्रजित’ चित्रपटाचेही ते दिग्दर्शक होते
दिग्दर्शक के व्ही राजू यांनी अमिताभ बच्चन यांचा ‘इंद्रजित’ चित्रपट दिग्दर्शित केला होता याशिवाय काजोल आणि जितेंद्र यांचा ‘उधार की जिंदगी’ चित्रपटही दिग्दर्शित केला होता. केव्ही राजू हे कन्नड चित्रपटातील लोकप्रिय आणि प्रतिभावान दिग्दर्शक होते ज्यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
‘या’ चित्रपटांचे केले दिग्दर्शन
1982 मध्ये त्यांनी सहयोगी दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. के व्ही राजू यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून 1984 मध्ये ‘ओलेव बडुकू’ या चित्रपटाद्वारे करिअरला सुरुवात केली. ‘युद्धकांडा’, ‘बेली मोडगालू’, ‘इंद्रजीत’, ‘कडाना’, ‘बेली कलुंगारा’, ‘हुलिया’ हे त्यांचे काही उत्कृष्ट चित्रपट आहेत.