आप सोडून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात
अमेठी (उत्तर प्रदेश)- अमेठी हा कधीच कोणाचा गढ नव्हता असे मत अमेठीचे राजा संजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. यंदा तेच या मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
“अमेठी हा कधीच कोणाचा बालेकिल्ला राहिला नाही, मग तो गांधींचा असो किंवा इतर कोणाचाही. तो नेहमीच जनतेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यांच्यावर कोणीही फार काळ एकतर्फी प्रभाव गाजवू शकत नाही, असे आज वृत्तसस्थेशी बोलताना ते म्हणाले. यावेळीही संजय सिंह यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी व माजी राष्ट्रीय बॅडमिंटन प्रमुख अमिता सिंह या उतरल्या आहेत. त्यांनी संजयसिंह यांच्या एकतर्फी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. या मतदार संघात कॉंग्रेसने आशिष शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे.
2019 मध्ये भाजपमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी कॉंग्रेस खासदार म्हणून आपली राज्यसभेची जागा सोडली होती. त्यानंतर आशिष शुक्ला पुन्हा कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. अमेठी जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण चार जागा असून त्यापकी तीन जागा गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या होत्या. तर एक जागा समाजवादी पक्षाला मिळाली होती.