लखनौ – उत्तर प्रदेशातील जनतेने ‘डबल इंजिन’ सरकारला जनादेश दिला आहे. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तेच्या चाव्या राखण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यश आले आहे.
भाजपला मिळालेल्या विजयानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सत्ता देण्याच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो, असं ते म्हणाले. परंतु यावेळी त्यानी लोकांवर संतापही व्यक्त केला.
नेमकं काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी
“उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला. मी जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. मी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य आणि जनतेला धन्यवाद देतो, सर्वच राजकीय पक्ष ईव्हीएमचा मुद्दा घेऊन आपला पराभव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ही ईव्हीएमची चूक नाही, लोकांच्या डोक्यात जी चिप टाकलीये त्याची आहे. आम्हाला यश मिळालं, परंतु ते ८०-२० असं आहे. आम्ही पुन्हा जोमानं कामाला लागू आणि पुढील वेळी आम्ही चांगली कामगिरी करू