बंगळुरू : सुधारीत नागरिकतव कायद्यामध्ये (का) घटनात्मक तरतुदीचे उल्लंघन होत आहे. हा कायदा माझ्या मते सर्वोच्च न्यायलयात फेटाळला जाऊ शकतो. कारण धार्मिक भेदाभावावर मुलभूत मानवी हक्क मिळू शकत नाहीत, असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले.
नागरिकत्व देण्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तो कोठे जन्मला आणि दोन तो कोठे राहतो, असे सांगून ते म्हणाले, माझ्या वाचनानुसार का कायद्याने घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन होत आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व ही लोकप्रतिनिधीगृहात चर्चा करण्याची गोष्ट आहे. तेथे अशा स्वरूपाचा धर्माच्या आधारावर केलेला भेदभाव चालणार नाही हे ठरवावे लागेल.
अन्य देशांत अत्याचार होत असलेले हिंदु हे सहानुभुतीसाठी पात्र आहेत. मात्र त्यांच्यावर होत असलेले अत्याचार आणि अन्य मुद्द्यांचा विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बाहेरून येणाऱ्या हल्लेखोरांना विद्यापीठ प्रशासन रोखू शकत नाही. मात्र विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांतील संवादास विलंब झालात्यामुळे विद्यार्थ्यांना वाईट वागणूक मिळाली. पोलिसांना ही घटना रोखता आली नाही,असे त्यांनी जेएनयु हल्ला प्रकरणाबाबत सांगितले.