नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन
बारामती : पुरंदर तालुक्यात झालेल्या ढग फुटीमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून कऱ्हानदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर नाझरे धरणातून पन्नास हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कऱ्हानदी काटच्या गावाना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री तीन वाजल्यापासून प्रशासनाकडून लाऊड स्पिकर लावून आवाहन करण्यात येत आहे. तसेच नदी लगतच्या कुटूंबाना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
पंधरा ते वीस वर्षात पहिल्यांदाच या नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. बारामती तालुक्यातील कऱ्हा नदी काटच्या आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कप, अंजनगाव, कऱ्हावागज , बऱ्हाणपूर, नेपतवळण, मेडद तसेच बारामती शहरालगची खंडोबानगर परिसरातील काही भागांना नदीच्या पाण्याचा धोका होण्याचा शक्यता आहे.