सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदरसाठीची गुंजवणीची योजना 350 कोटीवरून 1700 कोटीवर गेली, ती का झाली नाही? सासवडच्या पालखीतळावर अजित पवारांनी सभा घेऊन माझ्या पसंतीचा खासदार निवडून द्या. तर मी तुम्हाला गुंजवणीचे पाणी देतो असे म्हटले होते. राज्याचे आपण गेली 35ते 40 वर्षे प्रमुख आहात. बारामती लोकसभा मतदारसंघातील विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुरंदरचा विकास हा खिशात ठेवला आहे का, असा सवाल आजित पावार यांना महेश भागवत यांनी केला आहे.
सासवड येथे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री आजित पवार खासदार सुप्रिया सुळे माजी केद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. महेश भागवत म्हणाले की, नाझरे धरणावर 24 गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना आहेत. त्या बंद आहेत.
नाझरे धरण ते वीर धरण 20 किलोमीटरचे अंतर आहे. जर 20 किलोमीटरची पाइपलाइन नाझरे धरणापर्यंत केली तर पावसाळ्यामध्ये विसर्ग होणार्या पाण्यातून नाझरे धरणा भरता येईल तर खडकवासल्याच्या धरणातून येणारा कालवा हा खालच्या भागातून जातो तेथेच 6 फूट पाइपलाइन केली तर नाझरे धरणामध्ये पाणी सोडता येईल. नाझरे धरणाच्या खालची लोक पाकिस्तानमधून आली आहेत का, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.