मुंबई – शिवसेनेचे 40 आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास त्यांना पक्ष देणार का?’, असा परखड प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अनेकांच्या मनात लोकशाहीबद्दल संदिग्धता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी विरोधी पक्षांनी अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा पवार यांनी केली.
पंजाबातील खलिस्तानवाद्यांना पाकिस्तान व अन्य देशातून निधी – मुख्यमंत्री मान
पवार म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान जपण्यात शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात गुंतवणूक येत नाहीत. मागील काळात आलेल्या गुंतवणूकांमुळे राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु, त्याही राज्याबाहेर गेल्या. त्यामुळे राज्याचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
शिंदे सरकारविरोधात जनभावना तीव्र…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासून राज्यात त्यांच्याविरोधात जनभावना तीव्र होत आहे. निवडणूक आयोगाच्या लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. विद्यमान शिंदे सरकार हे बेकायदा आणि घटनाबाह्य असून, या सरकार अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचे सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तीवादातून स्पष्ट होत आहे, असे पवार म्हणाले.