नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नानंतर विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांवर भूखंडाबाबत आरोप केल्याचे दिसून आले. त्यामुळे आजचा दिवसही चांगलाच वादळी ठरणार हे निश्चित होत. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत विधानसभेत बोलू देण्याची मागणी केली. यावरून एकच गोंधळ सुरु झाला आणि विरोधकांनी अखेर सभात्याग केला.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे फोन टॅपिंग प्रकरणात बोलू देण्याची मागणी केल्यानंतर अध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारली. यानंतर अध्यक्ष सरकारला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित अपवर यांनी केला. आपल्या अधिकाराचा वापर करून आपलीच बाजू योग्य कशी आहे. हे सांगण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणत अजित पवार यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.
आदित्य ठाकरे निशाणयवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूखंड प्रकरणावर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे दिसून आले. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका जुन्या प्रकरणात आदित्य ठाकरेंबाबत [प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. राणे यांनी थेट आफताब पुनावाला यांच्या आदित्य ठाकरेंची तुलना करत जोरदार टीका केली.