इंदापूर – इंदापूर तालुक्यातील जो आजचा विकास दिसतो. तो फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा माझ्या डोक्यावर हात असल्यामुळे आहे. आजपर्यंत जी पदे मिळाली ती फक्त अजितदादा यांच्या प्रेमामुळे, अशी कबुली माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापुर तालुक्यातील मौजे खोरोची येथे शनिवार (ता.२७ रोजी) जाहीर सभेत आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, दत्तात्रय घोगरे, बाळासाहेब करगळ, नवनाथ रुपणवर, संजय रुपणवर, संजय चव्हाण, सुभाष पाटील, सचिन खामगळ, संपतराव सरग, दादासाहेब भाळे, सचिन सपकळ, दत्तात्रय फरतडे, कांतीलाल नरुटे, हामा पाटील, माऊली हाके, मच्छिंद्र तरंगे, सचिन काळे, सतिश हेगडकर यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले की, माझा गावचा विकास व्हावा असे वाटते त्यात त्यांचा स्वार्थ नसतो. खोरोची गावात पाणी योजना, रस्तेचा वीस वर्षात झाले नाहीत. लोकांची अडचण दूर व्हावी म्हणून रस्ते केले, बोराटवाडी पुल केला. आनंदी गणेश येथिल पुल केला, तावशीचा पूल केला, माळशिरस व फलटण या दोन तालुक्यातील जनतेचा संपर्क यामुळे सोईस्कर झाला आहे. बिकेबिएन रस्ता पुर्ण झाला. त्यामुळे व्यवसाय वाढेल, दळणवळण योग्य होईल, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
विरोधकांनी तुम्ही फक्त शांत राहा, जनतेची कामे करताना आरोप करतात त्यामुळे तालुक्यातील जनता त्यांना जागा दाखवेल. काम करतो. मी मिद्दा नाही. विकास करतो. कामे करण्यासाठी मुंबई ला जावे लागते. नुसते पत्र देऊन काम होत नसते, असा टोला विरोधकांना आमदार भरणे यांनी लगावला.
यावेळी जिल्हा परीषेदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, कोणताही निधी खोरोची गावात विरोधक देत नाहीत. तरीही निलाड असल्यासारखं बॅनरबाजी करतात. हे बरोबर नाही. या भागातला शेतकऱ्यांचा ऊस भवानीनगर व बारामतीच्या साखर कारखान्याला गाळपासाठी जाते. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांना भीती घालू शकत नाहीत. विकास आमदार भरणेमामा करतात त्यांच्याच मागे जनतेने आगामी काळात उभे राहावे, असे आवाहन प्रतापराव पाटील यांनी केले.