खा. डॉ. विखे पाटील; पिंपळगाव माळवी येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत कार्यक्रम
नगर – ज्येष्ठांच्या आरोग्य अबाधित राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साठ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करुन खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या हिताची गोष्ट केली आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवनिमित्त राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करून 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी व डॉ. विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा कल्याण समाज विभागातर्फे राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गतमोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाले.
यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाशी घिगे, संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, रेवननाथ चोथे, हरिभाऊ कर्डिले, संतोष कुलट, सभापती सुरेशराव सुबे, जालिंदर कदम, बापूसाहेब बेरड, विश्वनाथ गुंड, सरपंच राधिका प्रभूंने, उपसरपंच भारती बनकर, प्रा. देवराम शिंदे, गटविकास अधिकारी रेश्मा होजगे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेली राष्ट्रीय वयोश्री योजना ही घरापर्यंत घेऊन जाण्याचे काम खासदार सुजय विखे पाटील करीत आहे. वयोवृद्धांसाठी सुरू असलेली राष्ट्रीय वयोश्री योजना ही कौतुकास्पद आहे. प्रास्ताविक आदर्शगाव मांजरसुंबाचे माजी सरपंच जालिंदर कदम यांनी केले. आभार विश्वनाथ गुंड यांनी मानले.