टाकळीभान – मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज टाकळीभान येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावर बसस्थानक परिसरात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंडळाधिकारी प्रशांत ओहळ यांना निवेदन देण्यात आल्यावर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्तारोकोमुळे श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, सरकारने सगेसोयरे अध्याधेश काढला, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सरकारने आपल्याला फसविले आहे. आपण कोणत्यातरी पार्टीशी व नेत्याशी संबधित आहोत पण हेच संबधित नेते आरक्षणाबाबत भांडत नाही.
त्यामुळे ती पार्टी व तो नेता आपल्या काही कामाचा नाही. लवकरच होणार्या लोकसभेच्या निवडणूकीत हेच नेते आपल्या दारात येणार असून त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या. जोपर्यंत सरकार सगेसोयरे अधिसूचनेची अंमल ्रबजावणी करीत नाही तोपर्यंत मतदान होऊ दऊ नका असे आवाहन करून जोपर्यंत आचारसंहिता लागत नाह्री तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी खंडागळे दिला. यावेळी प्रा. जयकर मगर, शिवाजीराव शिंदे, सुरेश कांगुणे, अनिल बोडखे, अॅड.दीपक कोकणे, राजेंद्र कोकणे आदींनी मनोगत व्यक्त केले.