नगर – जिल्हा परिषदेचे ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोड-फोड काही समाजकंटकानी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हे प्रचंड दहशतीत आहेत. महिला कर्मचार्यांची छेड काढणे, अधिकारी, कर्मचारी यांचेशी असभ्य वर्तण करणे,अशा घटना वारंवार घडतताअहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत पूर्ण वेळ २ बंदुकधारी पोलीस कर्मचारी नियुक्त करावी तसेच सिंगल डॊअर एंट्री असावी, अशी मागणी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी एक तास काम बंद आंदोलन करण्यात आले.
ग्रामिण भागाच्यात विकासामध्येस जिल्हा परिषदेचा मोलाचा वाटा आहे. आणि याच कारणाने जिल्हात परिषदेते अभ्यंयगतांचा वावर हा इतर शासकिय कार्यालयापेक्षा जास्तो आहे. कालच्या घटनेमुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी सुरक्षित नाहीत हे अधोरेखित झाले आहे. भविष्यात आशा घटना होणार नाही, अथवा समाजकंटकांना वचक बसावा आणि जिल्हा् परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या् सुरक्षेच्याण दृष्टिने जिल्हा परिषदेतपूर्ण वेळेसाठी 2 बंदुकधारी पोलीस आणि सिंगल डोअर एन्ट्री असावी.
या वेळी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ, शैलेश मोरे, मनोज ससे, समर्थ शेवाळे, अशोक कडूस, शिवाजी राऊत, किरण साळवे, सुभाष कराळे, विकास साळुंके, अभय गट, महेंद्र आंधळे, यशवंत सालके, सागर आगरकर, चंद्रकांत वाकचौरे, के. के. जाधव, प्रमोद साळवे, खलील शेख, प्रमोद राऊत, कल्पना शिंदे, प्रशांत मोरे, आदिनाथ मोरे, अनघा कुलकर्णी, बाळासाहेब सोनावळे, सोमनाथ मिटे, संतोष लंके, शशिकांत रासकर, मनोज चोभे, विलास वाघ, संदीप वाघमारे, अंबादास जमदाडे, योगिराज वारुळे, सुमित चव्हांण, अमोल गोसावी, नाना हांबर्डे, माऊली बोरुडे, विजय कोरडे, रजनी जाधव, स्मिता उंडे, विजया गायकवाड आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.