नवी दिल्ली: नुकतेच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षे भारतीय सशस्त्र दलात नोकरीची संधी मिळणार आहे. अग्निवीर म्हणून तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. ही योजना नेमकी काय आहे ? याबाबतची माहिती या लेखात करून घेऊया…
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri @narendramodi today approved an attractive recruitment scheme for Indian youth to serve in the Armed Forces.
The scheme is called AGNIPATH and the youth selected under this scheme will be known as Agniveers. pic.twitter.com/ogrikrmhcz
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) June 14, 2022
योजनेची पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय युवकांचे वय १७ वर्षे ६ महिने ते २१महिने दरम्यान असायला हवे अशी वयाची अट याकरिता असणार आहे. या योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण कालावधी सहीत एकूण ४ वर्षे सशस्त्र सेवेत सेवा करण्याची संधी मिळणार आहे. ही भरती सैन्य भरती नियमानुसारच होणार आहे.
किती मिळेल पगार ?
–अग्निवीरांसाठी पहिल्या वर्षी तरुणांना मासिक 30 हजार रुपये मानधनावर ठेवण्यात येणार आहे.
— तर ईपीएफ आणि पीपीएप या सुविधांसह अग्निवीरला पहिल्या वर्षी 4.76 लाख रुपये मिळणार आहेत.
–चौथ्या वर्षापर्यंत पगार 40 हजार रुपये म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे 6.92 लाख रुपये होणार आहे.
–अग्निवीरांसाठी सरकारकडून वार्षिक पॅकेजसह काही भत्तेदेखील उपलब्ध असणार आहेत.
— यामध्ये रिस्क अँड हार्डशिप, रेशन, ड्रेस आणि प्रवास भत्ता यांचा समावेश असणार आहे.
–सेवेदरम्यान अक्षम असल्यास, पूर्ण वेतन आणि सेवा नसलेल्या कालावधीसाठी व्याजदेखील उपलब्ध असणार आहे.
–‘सेवा निधी’ला प्राप्तिकरातून सूट दिली जाणार आहे.
–अग्निवीरला ग्रॅच्युइटी आणि पेन्शनचे लाभ मिळणार नाहीत.
–अग्निवीरांना भारतीय सशस्त्र दलातील त्यांच्या कार्यकाळासाठी 48 लाख रुपयांचे विना-सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत
अग्निवीर, त्याच्या तारुण्यात चार वर्षे पूर्ण केल्यानंतर, व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या प्रौढ आणि स्वयंशिस्त असेल. अग्निवीरच्या कार्यकाळानंतर नागरी जगामध्ये त्याच्या प्रगतीसाठी जे मार्ग आणि संधी उघडतील ते नक्कीच राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक जमेची बाजू असेल. याव्यतिरिक्त, सुमारे 11.71 लाख रुपयांचा सेवा निधी अग्निवीरला त्याच्या भविष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत करेल जे सहसा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील तरुणांवर होते.राष्ट्रसेवेच्या या काळात अग्निवीरांना विविध लष्करी कौशल्ये आणि अनुभव, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण, धैर्य आणि देशभक्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या चार वर्षांच्या कार्यकाळानंतर, अग्निवीरांना नागरी सेवा सुविधेमध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी अग्निवीरांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
सैन्यभरतीत प्राधान्य
कुशल आणि सक्षम असणारे 25 टक्के अग्निवीरही सैन्यात ठेवले जाणार आहेत. मात्र, त्या वेळी सैन्यात भरती झाली तरच हे शक्य होणार आहे. यासाठी 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले अग्निवीर स्वयंसेवक म्हणून काम करू शकणार आहेत. या प्रकल्पामुळे लष्कराचीही कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकणार आहे.