मुंबई – एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,गारपिटीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही.पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालायला सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान. ”वा रे ठाकरे सरकार” अशा शब्दांत भाजप पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर सरनाईकांचा ४ कोटी ३३ लाख लाखांचा दंड माफ केल्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी थेट मंत्रिमंडळाचा निर्णय. वा रे @OfficeofUT सरकार.
2/3— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 13, 2022
उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर एसटी कामगार आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला आहे.
दरम्यान,शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण रोड क्र. १ येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.या निर्णयावरुन भाजपाने नाराजी जाहीर केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही ट्विटरवर व्हिडियो शेअर करत ठाकरे सरकार टीका केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ट्विट
“ठाणे येथील विहंग गार्डन चे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही”@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/4smeE4kJGX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 12, 2022