वडूज – येलमरवाडी, ता. खटाव येथील शिंगाडे वस्तीतील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. या प्रकरणी कार्यवाही करू, असे लेखी आश्वासन तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यामध्ये हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे व पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली.
शिंगाडे वस्तीत गेल्या 40 वर्षांपासून दीडशे लोक वास्तव्यास आहेत. आजूबाजूच्या शेतातून हे ग्रामस्थ वस्तीवर ये-जा करत होते. गेल्या चार-पाच वर्षांत या वस्तीकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांची कोंडी झाली आहे. प्रशासनाने रस्त्याच्या समस्येवर तातडीने मार्ग काढावा यासाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.
सरपंच पोपट शिंगाडे, रोहिदास शिंगाडे, विश्वनाथ शिंगाडे, तानाजी शिंगाडे, महादेव शिंगाडे, दिलीप शिंगाडे, राजेंद्र शिंगाडे, मधुकर शिंगाडे, पांडुरंग शिंगाडे, दिनकर शिंगाडे, आकाराम शिंगाडे, मस्कू शिंगाडे, किसन शिंगाडे, सुनील शिंगाडे, लक्ष्मण शिंगाडे, विलास शिंगाडे, माजी सरपंच अलका शिंगाडे, अरुणा शिंगाडे, लीलाबाई शिंगाडे, योगिता शिंगाडे उपोषणात सहभागी झाल्या होत्या. देशमुख, मांडवे व धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ते राजूभाई मुलाणी, माजी सरपंच शरद बागल, प्रसाद बागल, सदाशिव बागल उपस्थित होते.