मुंबई – ठाकरे गटाचे तरुण आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान करत त्यांच्यावर जोडरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजप सोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले आहे.
त्यानंतर आता ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत. पक्ष फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेताहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधत आहेत.
दरम्यान, नुकतंच वरळीतून घेतलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंना काही दिवसांपूर्वी केलेल्या चॅलेंजची आठवण करून दिली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “काही दिवसापूर्वी दिलेल्या चँलेंजची आठवण करून देत… मी आमदारकीच राजीनामा देतो…
तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या… त्यानंतर आपण वरळीतून लढण्याचे चँलेंज दिले होते. त्याचे काय झाले?’ असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
‘मी वरळीमधून राजीनामा देतो… तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा’ – आदित्य ठाकरे
“महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर पुन्हा निवडून येता का ते पाहा.
मी तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलं आहे. मी वरळीमधून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. मग पाहू तुम्ही कसे निवडून येता? असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंना केलं होत.