शिरूर – शिरूर लोकसभा मतदारसंघतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथील सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष करत, थेट आरोप केले होते.
त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुरावे द्या, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घ्या, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे सादर केले असून आता आढळराव पाटील हे मुद्दे कसे खोडून काढणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आढळराव पाटलांनी लोकसभेत तारखेनुसार मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे अमोल कोल्हे यांनी दाखवली आहेत. आढळराव पाटलांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला? असा सवाल उपस्थित करत याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं, असे प्रती आव्हानही अमोल कोल्हेंनी दिले आहे.
तसेच हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. असे म्हणत सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवत हे सगळे पुरावे टप्याटप्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आढळराव पाटील कोल्हेंच्या आरोप प्रत्यरोपामुळे शिरूरच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.