शिरूर (प्रतिनिधी): कोरोना व्हायरसची दहशत आणि आणि शेकडो किलोमीटर पायी गावी निघाले आहेत. दरम्यान एका मजुराच्या मुलीचा वाटेत अपघात झाला. अपघात झाल्यानंतर गंभीर अवस्थेत मुलीच्या उपचारासाठी वडिलांच्या खिशात फक्त शंभर रुपये होते. मात्र पैशांची अपेक्षा न करता डॉक्टर अखीलेश राजूरकर उपचार केल्याने १७ वर्षाच्या मुलीला जीवदान मिळाले.
डॉक्टरांना वनमंत्री संजयजी राठोड व पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनीही सहकार्य करणार असल्याचे सांगितले. परंतु डॉक्टरांनी या मुलीची जबाबदारी आता आमची असल्याचे सांगितल्याने वनमंत्री संजय राठोड आणि आमदार इंद्रणील नाईक ही अवाक झाले. या मुलीच्या कुटुंबीयांची जेवणापासून तर औषधोपचाराचा सर्व खर्च हॉस्पिटल ने उचलला आहे.
याबाबत सविस्तर माहिती सध्या कोरोनाव्हायरस ची दहशत संपूर्ण जगामध्ये पसरली त्यात शिरूर तालुका ही आला आहे. जीवाच्या भीतीने आणि आणि कोरोनाव्हायरस च्या दहशतीने सर्वसामान्य नागरिक पूर्णपणे खचून गेला आहे. भर उन्हाच्या दिवसात अनवाणी पायाने तर काहीजण पायाला वर्तमानपत्र लावून लहान-लहान चिमुकली घेऊन भर उनात चालत आहेत.
जिल्ह्यात रांजणगाव एमआयडीसी ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मजूर गावी जात आहेत. यात कारेगाव येथे बळीराम जाधव हे आपल्या पत्नी व मुलासह राहणारे मजूर कुटुंब हे रात्रीच्या वेळी गावी पायी निघालेले होते. दरम्यान, बळीराम जाधव यांची मुलगी जयश्री जाधव (वय १७) यांचा रस्त्यात अपघात होऊन डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिकांनी तत्काळ शिरूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर अखिलेश राजूरकर डॉ विशाल महाजन यांनी सदर मुलीची परिस्थिती पाहता उपचार सुरू केले.
या मुलीचे जीव वाचविण्यासाठी हॉस्पिटल चे डॉक्टर अखिलेश राजूरकर, डॉ विशाल महाजन, डॉ. सारंग पाठक, डॉ. सौरभ पाठक, डॉ.राजेंद्र ढोले, डॉ. विष्णु मोरे,सूरज खरात,अविनाश अखंड, ऋतु राज चव्हाण,ऋषिकेश चव्हाण,विक्की नाईक,संगीता कोल्हे,वैशाली पडवळ यांनी सहकार्य केले.