मुंबई – अभिनेता अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा घूमर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्यासाठी त्याचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिषेकने अलीकडेच पत्नी ऐश्वर्या राय बच्चन बद्दल सांगितले की त्याची पत्नी त्याचा राग कसा नियंत्रित करते
अभिषेकची पत्नी ऐश्वर्या त्याला त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची आठवण कशी करून देते. तो म्हणाला, ‘तु मुंबईत असतो तेव्हा तुला ट्रॅफिकचा त्रास होतो. त्यावेळी शांत रहा. तुला माहीत आहे की तु घरी येतो तेव्हा तुझे शांत आणि आनंदी कुटुंब त्यामुळे चिडचिड करणे थांबवं.’ असं म्हणत ऐश्वर्या माझी समजूत काढत असते.
या संभाषणात अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, ‘मला आठवते की, ऐशने मला एकदा सांगितले होते, आणि या गोष्टीने मी खूप प्रभावित झालो. माझे वडील, मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी एका वेळी हॉस्पिटलमध्ये होतो. हळूहळू आमची सुटका झाली. मी जवळपास एक महिना इस्पितळात होतो आणि जेव्हा मी घरी परत आलो, तेव्हा ती म्हणाली की तुम्हाला माहीत आहे की आपण किती भाग्यवान आहोत, की आपण सर्व अजूनही एकत्र आहोत. अशी अनेक कुटुंबे आहेत जी कोविडमुळे उद्ध्वस्त झाली आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत.’ असं म्हणत तिने मला कुटूंबांचे महत्त्व सांगितले.