दिल्ली – स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ संकल्प करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. ज्याला 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिले जात आहे. बुधवारी तालकटोरा स्टेडियमवर ‘मेक इंडिया नंबर 1’ मोहिमेचा शुभारंभ करताना, सीएम केजरीवाल यांनी भारताला जगातील सर्वात श्रीमंत देश बनवण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण कामांचा संकल्प केला.
आपल्याला भारताला पुन्हा एकदा जगातील १ नंबरचा देश बनवायचा आहे. म्हणून आपण यासाठी एका राष्ट्रीय मिशनची सुरुवात करणार आहोत. या देशातील प्रत्येक नागरिकाला १३० कोटी लोकांना या अभियानाशी जोडायचे आहे असे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. ‘मेक इंडिया नंबर १’ असे केजरीवाल यांनी सुरु केलेल्या अभियानाचे नाव आहे.
भारताला जगात नंबर १ बनवण्यासाठी यावेळी केजरीवाल यांनी प्रमुख ५ कामे सांगितली
१) चांगल्या शिक्षणासाठी कार्य करणार,.27 कोटी मुले दररोज शाळेत जातात आणि त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल. देशाच्या कानाकोपऱ्यात शाळा सुरू कराव्या लागतील. यासाठी किती पैसे खर्च करावे लागू देत सर्वप्रथम चांगल्या शिक्षणासाठी काम करणार.
२) आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला सर्वोत्तम उपचारांची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी मोफत उपचाराची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी कितीही खर्च असो. प्रत्येक भारतीयाचे जीवन महत्त्वाचे आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात शाळा आणि रुग्णालये उघडावी लागतील.
३) आज तरुण बेरोजगार फिरत आहेत, त्यांच्यासाठी रोजगाराची व्यवस्था करावी लागेल.
४) देशातील प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक स्त्रीला संरक्षण मिळाले पाहिजे. हे सांगणे खूप सोपे आहे, परंतु हे आपल्याला आपल्या घरात आणि समाजात करावे लागेल.
५) शेतकर्याला पिकाची पूर्ण किंमत मिळण्यासाठी अशी व्यवस्था करावी लागेल जेणेकरून शेतकर्याचा मुलगा म्हणेल की त्याला शेतकरी व्हायचे आहे.