रवींद्र कदम
नगर – ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी आलेली मुले शहरात येऊन वेगळ्याच वळणावर जात असल्याचे दिसत आहे. शहरी मुलांचा एक गट तर ग्रामीण भागातून आलेल्या मुलांचा एक गट तयार होवून शहरातील महाविद्यालय परिसरात काहीना काही कारणावरून धुमश्चक्री होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात काही इंटरेस्ट दिसत नसून सध्या भाईगिरीतचा कल भाईगीरीकडे वाढ्त असल्याचे महाविद्यालयात होत असलेल्या हणामारीच्या घटनावरून दिसून येत आहे. त्याबाबत पालकही अनभिज्ञ असल्याचे दिसत असून पालकांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
नगर शहरात अहमदनगर महाविद्यालय, न्यू आर्ट कॉमर्स ऍन्ड सायन्स, पेमराज सारडा, पोलिटेक्नीक, रिसीडेन्सीलसारखी मोठी महाविद्यालय आहेत. या विद्यालयात आपल्या मुलांनी शिक्षण घेवून एक उज्ज्वल भविष्य घडवावे असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. त्यासाठी पालक आपला मुलाच्या भविष्यासाठी रात्रदिवस काबाड कष्ट करून मुलांच्या सगळा अट्टाहस पूर्ण करतात. त्याचे उदाहरण ग्रामीण भागात जास्त पहावयास मिळते.
मात्र, काही मुले याला अपवाद असून अभ्यासकडे दुर्लक्षकरत विद्यार्थी दुसऱ्याच वळणावर जात असल्याचे सध्या शहरात दिसत आहे. शहरातील महाविद्यालय परिसरात तसेच बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांचे दोन गटात धुमश्चक्र अनेक वेळा नागरिकांना पहावयास मिळत आहे.
हा वाद एक तर मुलींवरून तर माझी गॅंग मोठी त्यातच गावाकडील एक गट तर शहरातील स्थानिक विद्यार्थ्यांचा एक गट तयार झाल्यानेच हे वाद उफळला जात असून त्यामध्ये नाहक दुसऱ्या मुलांना दुखापत झाल्याच्याही घटना समोर येत आहे. मात्र ह्या घटना पोलीस ठाण्यापर्यंत येत नाही किंवा पालकही मुलांच्या आयुष्यावर ठपका लागेल म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार देत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे आनखीनच बळ वाढत असून अशा घटनांना अप्रत्यक्ष पालकच पाठबळच देत आहे.
स्वत: ची बढाई आली अंगलट
शहरात नुकताच झालेल्या दोन गटातील धुमश्चक्रती पोलीस प्रशासनाने एका विद्यार्थ्यास ताब्यात घेतले. त्याचा फोन तपासला असता कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषणात भाईगीरी करत विद्यार्थ्यांमध्ये मी किती मोठा भाई असल्याचे माझे गुंडाबरोबर हात आहेत. असे इतर विद्यार्थ्यांना दाखवण्याचे काम केले. मात्र पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच त्याचा काही एक संबंध नाही. मुलांच्या टोळक्यात मी किती मोठा भाई असल्याचे भासवत असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनाने याबाबत त्याच्या पालकांना बोलवून विद्यार्थ्यांचा प्रताप दाखवत समज दिली. त्याचवेळी पालकांनी मात्र, मुलाचा खरपूस समाचार घेतला.