कोल्हापूर/प्रतिनिधी- कोल्हापूरात ख्रिस्ती बांधव आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावातील ख्रिस्ती समाजाची 100 वर्षां पूर्वीची 53 एकर जमीन सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमताने फेरफार करून लाटणाऱ्या दीपक गायकवाड कर कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी आजपासून कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे.
साखळी उपोषणात जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले आहेत. दीपक गायकवाड याला हाताशी धरू बेकायदेशीर आदेश बजावणाऱ्या पन्हाळा प्रांत अजय पवार आणि भूमी अभिलेख अधिक्षक सुनील नाळे यांच्या वर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा खिस्ती समाजाचाने दिला आहे.
तसंच पन्हाळा भुमीलेख अधिकारी यांनी केलेला फेरफार रद्द करून उर्वरित जुन्या नोंदी कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बेमुदत साखळी उपोषणात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.