नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. सरकारने नव्याने पारित केलेले कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापुढे अखेर अहंकारी भाजप सरकारला मस्तक व्हावे लागले.
शेतकऱ्यांवर काळे कायदे लादून त्यांचे आर्थिक शोषण करण्याचा मोदी सरकारचा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावला. देशातील सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन .
जय हिंद, जय जवान ,जय किसान! https://t.co/6R7oHgsrBz— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 19, 2021
दरम्यान, पंतप्रधानांच्या या निर्णयावर खासदार राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारला चिमटा काढत निर्णयाचे स्वागत केले आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. मात्र केंद्र सरकारची फक्त उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना? केंद्र सरकारमुळे 600 शेतकऱ्यांचा आंदोलनात जीव गेला हे मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.